स्मरणशक्ती कशी वाढवावी?
बदाम भिजत घाला आणि रोज खा किंवा शंकपुष्पी घ्या… अस काही मी सांगणार नाही.
स्मरणशक्ती कमजोर होण्याची कारण आधी लक्षात घ्या. सर्वात मुख्य कारण दुर्लक्ष करणे, कंटाळा करणे, समोरच्या व्यक्तीच्या कामाला महत्त्व न देणे.
आठवून बघा आपल्याला आई, वडील काहीतरी काम सांगतात, “करेन” अस म्हणून आपण ते काम अंगावर पण घेतो. पण नंतर विसरतो. का?
एकतर आपण गंभीरपणे त्या कामाची जबाबदारी घेतलेली नसते. रोजच काम सांगतात म्हणून दुर्लक्ष करतो किंवा उद्या करू म्हणून आळस करतो. परिणाम ते काम करायचं आपण विसरतो.
आणि ही सवय अंगवळणी पडली की आपल्याला वाटत आपली स्मरणशक्ती कमी झालीय.
अस काही नसत तुम्ही आठवण ठेवून जबाबदारीने गोष्टी करायला सुरुवात करा. तुमची स्मरणशक्ती वाढेल.
आपल मन ना चंचल असत, त्याला वळण लावावं लागत. मनाला बजावून सांगा मी आठवणीने सगळी कामं करीन बघा मन स्वतः तुम्हाला आठवण करून देईन
यावरून मी स्वतः च अनुभव सांगते, मला जेंव्हा कधी सकाळी लवकर उठून प्रवासाला जायचं असत किंवा एखादं काम सकाळी करायचं असत अशावेळी मी कधीच अलार्म लावत नाही. मी फक्त झोपतांना मनाला सांगते की मला किती वाजता जाग यायला हवी ते, आणि खरच मी अलार्म न लावते बरोबर वेळेवर जागी होते.
तुम्हीही करून बघा.
हो त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट शिकावी लागेल.
ती म्हणजे ध्यान लावणे. आणि गायत्री मंत्र म्हणणे.
गायत्री मंत्र माहित असेलच आता तर सायन्स ने सिद्ध केलय गायत्री मंत्राची महती. मग तो तर आपला आहे ना, आपण का आचरणात आणू नये.?
रोज मोठ्या आवाजात गायत्री मंत्र म्हणा, ओमकार म्हणा. याच का मागच्या जन्मीचं पण आठवेल (हा विनोद नाही हं…)
लेखिका : प्रतिभा वडनेरे
धन्यवाद !

0 टिप्पण्या